शनिवार, २६ मे, २०१२

"उत्तम मार्दव"

"उत्तम मार्दव"

   जाति, कुल, रूप, ज्ञान, धन वगैरेँचा गर्व न करणे, मार्दव होय.
मृदुता हा आत्म्याचा मूळ स्वभावच आहे. पण मीपणाची भावना त्यास कर्मबंधनात बांधते.
मार्दवतेचा अंगीकार करून आपल्या मूळ तत्त्वाकडे जाणे हीच तर जीवनाची इतिकर्तव्यता असते.
'इदं न मम' ही वृत्ती उत्तम मार्दवतेतूनच तर येते.
अहंकाराचा त्याग करूनच तर मनुष्य देवत्व प्राप्त करू शकतो.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या या साध्या शब्दात किती गहन अर्थ सामावलेला आहे...
"अहंकार गेला।
तुका म्हणे देव झाला।।"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा