शनिवार, २६ मे, २०१२

"उत्तम आर्जव"

"उत्तम आर्जव"

मन,वचन,कायेची कुटिलता न करणे,आर्जव होय.
ऋजुता,सरळपणा,साधेपणा जितका सरल तितका बाणवणे कठीण.
सरळस्वभावी व्यक्ति विश्वासास पात्र ठरते, वाकड्यात शिरणारी संशयास.
स्वभावाला औषध नाही हे खरं असलं तरी दुसय्राचं अहित करायचं कारणच नसेल तर विचारात,बोलण्यात,कृतीत नेहमी सरलताच राहील.
उत्तम आर्जवाच्या आराधनेतून विश्वास,आशावाद,कृतिशीलता,आनंदी
वृत्ती निर्माण होते.
म्हणून तर ज्ञानेश्वरमाऊली अखिल विश्वासाठी पसायदान मागताना म्हणतात..
खळांची व्यंकटी सांडो!
(दुष्टांचा वाकडेपणा नष्ट होवो)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा